एकोणिसाव्या शतकातील एका दंतकथेनूसार सत्य आणि असत्य यांची एकदा भेट झाली. असत्य सत्याला म्हणाले, आजचा दिवस किती सुंदर आहे.
सत्याने काहिशा संशयाने आजुबाजूला पाहिले, खरोखरच दिवसाचा नजारा सुंदर होता. दोघांनी खूप गप्पा मारल्या. आसपास फिरताना तलावातील पाण्याकडे पाहून असत्य सत्याला म्हणाले, किती सुंदर आहे हे पाणी. सत्याने पुन्हा एकदा संशयाने तलावाकडे नजर फिरवली. खरोखरच, खूपच सुंदर दृष्य होते ते ! असत्य सत्याला म्हणाले, चल, जरा या तलावात पोहू या. सत्याने होकार दिला. दोघांनी कपडे उतरवले आणि पाण्यात उतरले. काही वेळात असत्य पाण्याबाहेर आले. त्याने सत्याचे कपडे उचलले आणि तेथून धूम ठोकली. सत्य बिचारे तसेच नागड्याने बाहेर आले आणि असत्याच्या मागे धावू लागले.
रस्त्यात अनेकदा त्या नागड्या सत्याला पाहिले, आणि मान वळवली. लोकांना लाजून बिचारे सत्य लांब पळून गेले आणि लोकांच्या नजरेआड जाऊन लपले.
असत्याने आता सत्याचे कपडे चढवले आहेत आणि लोकांना सोयीनूसार जिथे त्यांना गरज लागेल तिथे ते सत्य म्हणून हजेरी लावत असते.
I invite you to visit my blog
ekoshapu.in
LikeLike
YES SIR
LikeLike